जळगांव जामोद
जळगांव जामोद शहर आणि ग्रामीण परिसरात शनिवार दिनांक २० मार्च रोजी रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर आलेल्या या सणानिमित्त शहरातील मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आणि एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.सकाळपासूनच शहरातील मशीद मध्ये मुस्लिम बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नमाजसाठी गर्दी केली होती. नमाजानंतर घराघरात शिरखुरमा आणि विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेत हा सण साजरा करण्यात आला. या आनंदाच्या सोहळ्यात स्नेहाचा व प्रेमाचा संदेश देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,शहराध्यक्ष अमर पाचपोर,नगरसेविका सौ.मिनाताई सातव, डॉ. संदीप वाकेकर,ॲड. रतन इंगळे,राजु घुटे,अँड.संदिप मानकर,हुसेन डायमंड,विलास भारसाकळे,शंकर म्हस्के,निलेश तायडे,ओ.पी.तायडे, संतोष गावंडे,सै.अफरोज,नासिर भाई,शेख जुनेद,हुसैन राही,सैय्यद तौफिक,राजीक भाई,अयाज पुनीवाले,दिनेश काटकर,गजानन राजपुत,मनसुर भाई, साहेबराव तायडे,आदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर कार्यकर्ते यांनी स्थानिक दुर्गा चौक येथे उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.शहरात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

